शेताची भौतिक स्थिती सुधारून जनतेला चवीष्ठ, सकस, दर्जेदार अन्न पुरवठा करणे हा उद्देश आहेच; शिवाय उत्पादन खर्च कमी करून शेताची उत्पादकता अनेक पटीने वढवून शेतकर्यांचा आर्थिक उद्धार घडवून आणणे हाही उद्देश आहे."अन्न समाज घडवतो" या म्हणण्यात तथ्य आहे. हे शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध झालेले आहे. थोडा विचार केलात तर ते पटण्या सारखेही आहे. सकस अन्न सेवनाने शरीर सुधृड होते, शरीरात योग्य प्रकारची हवीत तेवढीच रासायने, संप्रेरके वगैरे तयार होतात. यापैकी कांही संप्रेरकांमुळे विचार स्फूरतात, आपले वागणे आपल्या विचारांवर अवलंबुन असते. स्वस्थ-निरोगी शरीर, स्वस्थ-निरोगी रासायनांची निर्मिती, स्वस्थ-निरोगी विचार, आणि त्या द्वारे स्वस्थ-निरोगी वागणे असे ते समीकरण आहे. समाजातील प्रतेक घटक सुधृड होईल तर संपूर्ण समाज सुधृड असेल. शारीरिक आणि मानसिक दृष्ट्याही.
समाजाला समाज सुधारकांची गरज नसते; तर सकस अन्न पुरवणार्या शेतकर्यांची नितांत गरज असते. “एक शब्दही न ऊच्चारता समाज सुधारणारा स्थितप्रज्ञ” असाही शेतकर्यांचा गौरव होऊ शकतो! एवढे मोठे कार्य करूनही अलाहिदा रहाणारा, या सर्वाचे श्रेय स्वता: कडे येते हे माहीतही नसलेला संत महात्मा!
Sunday, August 16, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment